विवाहित युवकाने केली आत्महत्या आत्महतेचे कारन अद्याप कळु शकले नाही नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी येथील घटना
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रविन वाघे मो, 7038115037
तलोधी बा, :-गंगासागर हेटी येथे घरजवाई म्हणून राहनार्या 30 वर्षीय युवकाने शेतात कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली आहे. आशिष मारोती बोरकर (वय 30) असे मृताचे नाव आहे. 10 वर्षांपूर्वी आशिषचे लग्न नागभीड तहसीलच्या गंगासागर हेटी या गावातील मुलीशी झाले होते. त्याच्या सासर्याला मुलीच, असल्यामुळे ते सासरच्या घरात जमाई म्हणून राहायचे.
आज शेजारच्या सावरला गावाजवळ धान शेतात धान्याचा पेरणीसाठी तयार असलेला शेतात अचानक मृतदेह आढळला. या घटनेची माहिती आज कुटूंबाला मिळाली. याबाबत नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून प्रेत शवेच्छदनासाठी करीता नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला.
मात्र आषिश च्या आत्महत्या चे कारन अद्यापही कळले नाही. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पच्छात दोन लहान मुली व पत्नी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
पुढील तपास तळोधी पोलीस स्टेशन चे ठाणेदार खैलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बलदार पठाण, बिहारे, रामटेके, रूपेश घोंगे करीत आहेत.
