ग्रामीण भागातील मानविकास अंतर्गत बस शालेय वेळेवर सुरु करा- सामाजिक कार्यकर्ता.ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी.

ग्रामीण भागातील मानविकास अंतर्गत बस शालेय वेळेवर  सुरु करा-  सामाजिक कार्यकर्ता.ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी.


सावली तालुका प्रतीनीधी

प्राजक्ता  उमेश गोलेपल्लीवार

9623494935


सावली :- सध्या लाॅकडाउन असल्यामुळे सावली तालुक्यातील बस सेवा पुर्णता बंद आहे त्याचा फटका ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी यांना बसत आहे. सावली तालुक्यातील वर्ग ८ ते १२वी पर्यन्त शाळा सुरु झाले असल्याने ग्रामीन भागातील  शालेय विद्यार्थी  सावली तालुक्याच्या ठिकाणी शाळेच्या वेळेवर ये जा करावे लागते‌ .तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध कामा करीता,शेति निविष्ठा खरेदी,आरोग्या करिता दवाखाना तसेच शेतमाल व धान्य विक्री,विविध कामा करीता तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.  बस सेवा बंद  असल्यामुळे सदर बाबीचा फटका विद्यार्थी व  शेतकरी  शेतमजुरास.  सामान्य नागरिकास   बसत आहे, कारण सामान्य माणसाजवळ स्वतःचे वाहन नसल्यामुळे शेतकरी वर्गाला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे दोन चाकी वाहनानि जाने-येणे करू शकत नाही. 

      करीता एस.टी. महामंडळा मार्फत मुल सावली ते हरांबा उपरी मार्ग व कवठी चामोर्शी गडचिरोली केरोडा चांदली याप्रमाणे शालेय वेळेवर  बस सेवा तातडीने सुरू करावि अशी मागणी, सामाजिक कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य  तथा तंटामुक्ती अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler