अनेकदा निवेदन देऊन सुद्धा केम या गावाला नाही स्मशानभूमी? केम गावातील ग्रामस्थाना प्रशासनाने सोडले वाऱ्यावर
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा तालुक्यातील टेमुर्ड्यापासून ९ किलोमीटरवर असलेले तिन्हिबाजुने झुडपी जंगलाने वेढलेले आणि याच जंगलात असणाऱ्या सिताफळामुळे जिल्ह्यात वेगळी ओळख आहे
हा गाव सुमठाणा ग्रामपंचायत मध्ये येणारे असल्याने आधीच हे गाव विकासाच्या दृष्टिने मागासले आहे येथील ग्रामस्थानी अनेकदा शासनदरबारी स्मशानभूमी विषयी कैफियत सागितली कित्तेकदा निवदेन दिले पण आजतागायत येथे स्मशानभूमी झाली नाही यामुळेच येथील नागरीकाना स्मशानभूमी विषयी विचारले असता ते सांगतात आमच्या गावातील नागरिकांना महाभारातील काही गुरुवर्यासारखे येथील नागरीक अमरच असते यांना मरण नाही आणि त्यामुळेच येथे साधे स्मशानभूमी चे शेड तर सोडा साधी स्मशानभूमीसाठी जागा पण नाही. कदाचित संपुर्ण महाराष्ट्रात हे एक असं गाव आहे की इथे स्मशानभूमी नाही पण गावातील पुढाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधी यांना पण याविषयी जाण नसावी हे या गावाचे दुर्भाग्य च म्हणावे लागेल.
