प्रहार सेवक शेरखान पठाण यांच्या प्रयत्नामुळे मिळाला बोटेझरी भगवान पूर येथील पुनर्वसन शेतकऱ्याना न्याय
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रहार सेवक शेरखान पठाण यांनी मुलं तालुक्यातील बोटेझरी भगवानपूर या पुनर्वसन गावाची काही दिवसा अगोदर मा. जिल्हाधिकारी याच्या कडे काही समस्याची बैठक लावली होती ना. बचू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात काही समस्या चे निराकरण झाले १४ वर्षा पासून शेतकरी यांना हक्काची जमीन मिळाली नव्हती ते जमीन शेतकऱ्यांना प्रहार सेवक शेरखान पठाण यांच्या प्रयत्ना मुळे १८ शेतकऱ्यांना जमिनीचे ७/१२ व जमीन मिळून देण्यात यश मिळाले व काही राहिलेल्या लाभार्थ्यांना लवकरच मा.वन मंत्री यांच्या कडे बैठक लावून राहिलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला भाग पाडू असे अस्वासन प्रहार सेवकांनी बोटेझरी गाव वासियांनी दिले.