चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कामे घेऊन प्रहार सेवक शेरखान यांनी घेतली थेट अचलपूर दिशेने राज्यमंत्री बच्चु कडे धाव.
चंद्रपूर जिल्ह्यातील पुनर्वसन व गोर गरीब शेतकरी यांच्या समस्या मार्गी लागणार (बच्चु कडु.)
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी:-प्रवीण वाघे
मो, 7038115037
चंद्रपूर:- यांच्या सोबत पाठाळा तालुका वरोरा येथील W C L ने ७ शेतकऱ्यांची जमीन संपादित करावी. म्हणून व चिमुर, वरोरा, भद्रावती तालुक्यातील फाॅरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि.) मध्ये १९८६ पासून ते २०१८ पर्यंत अग्निरक्षक चे काम करीत होते.तरी काम करत असतांनाच पगारातून कर्मचारी निधी म्हणून कपात होत होते . ते राहिलेली शिल्लक रक्कम मिळवून देण्यासाठी व मुल तालुक्यातील (भगवानपूर) बोटेझरी पुनर्वसन यांच्या मिटिंगबाबत.वनमंत्री यांच्याकडे मिटिंग लावण्यासाठी बोलवण्यात आले व वरोरा, चिमुर तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्याच्या नकाशावर त्या गावाची कोणत्याच तालुक्यात नोंद नसलेल्या पुनर्वसन गावाची प्रकल्पग्रस्त (निमवेला ,चंदईनाला ) प्रकल्पात बोळी क्षेत्रात गेलेल्या शेतकरी व गावकऱ्यांची समस्या व अशे विविध कामे घेऊन आज अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे राज्यमंत्री मा.ना.बच्चुभाऊ कडू साहेब यांच्याकडे दि, २७/११/२०२१ रोजी. कर्तव्य पूर्ती यात्रेमध्ये मा.ना. बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या कडे प्रहार सेवक शेरखान भाऊ पठाण यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडत असताना लगेच मा.ना. बच्चुभाऊ कडू साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना फोन केले व चंदई नाला प्रकल्पग्रस्ताची मिटींग येत्या काही दिवसातच जलसंपदा, पाटबंधारे, व पुनर्वसन जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्यासोबत मिटिंग आयोजित केली आहे. राज्यमंत्री मा.ना. बच्चुभाऊ कडू साहेबांनी सांगितले की लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील पुनर्वसन व शेतकरी यांच्या समस्या मार्गी लागणार आहे, असे बच्चुभाऊ कडू साहेबांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित चंद्रपूर जिल्ह्यातील प्रहार सेवक शेरखान भाऊ पठाण व शेतकरी वर्ग उपस्थित होते....