वनविभाग च्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने केले विष प्राशन उभ्या पिकावर चालवला बुल्डोजर वनविभागाच्या या मनमानी कारभारा ला कंटाळून शेतकऱ्यांनी घेतले विष
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गणेश उराडे 892880058
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी वाहिल्यालेल्या जमिनीवरील उभ्या पिकावर खड्डे खोदून झाडें लावण्याचे काम वानविभाग करित असून वनविभाग् अत्याचाराचा कळस गाठत असल्याचे प्रकार घडत आहेत. वन विभागाच्या निष्ठुर भूमिकेला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
कोरपना तालुक्यातील मांडवा येथील वामन रामभाऊ कोल्हे यांच्या शेतात वीस ते तीस वनविभागाचे कर्मचारी जाऊन उभ्या पिकाची नासधूस करून डोजरणे खड्डे खोदले असल्याने यात श्री. कोल्हे यांच्या पिकाची प्रचंड नुकसान झाली हा धक्का सहन न झाल्याने दिनांक 21/1/2022 ला कोल्हे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याने पुन्हा एकदा वनविभागाची दादागिरी चव्हाट्यावर आली आहे.
या घटनेचा तीव्र निषेध श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनश्याम मेश्राम यांनी केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे उपविभागीय अधिकारी राजुरा यांचे मार्फत निवेदन पाठवून वनविभागाचा वाढता अत्याचार थांबविण्यात यावा अशी मागणी केली आहे.
राजुरा उपविभाग हे पूर्वी निजामाच्या अधिपत्या खाली होता यामुळे 1930 चा कुठलाही पुरावा शासनाकडे ऊपलब्ध नसल्याने गैरआदीवासी पुरावे देणार कुठून ? असा प्रश्नही घनश्याम मेश्राम यांनी उपस्थित केला आहे.