प्रधानमंत्री आवास योजने मध्ये पूरग्रस्तांना प्राध्यान्य द्या
चंद्रपूर जिल्हा संपादक
राकेश भूतकर
मो. न. 8308264808
प्रहार सेवक विनोद उमरे यांची मागणी
चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली असुन. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घराची पडझड झाली होती. कोणाला अपंगत्व तर लोकांना आपला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुध्दा झाले.त्यामुळे अनेक गावांतील काही घरांचे अंशतः तर काहीचे पूर्णतः नुकसान झाले असून निवाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशावेळी ते तत्काळ घर बांधकाम करु शकत नाही तर विशेष बाब म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेत पूरग्रस्तांना प्राध्यान्य देण्यात यावे अशी मागणी समाज कार्यरत नेहेमी अग्रेसर असणारे शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे यांनी मागणी केली आहे....